भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेबाबत संक्षिप्त टिपणी
पाण्याचे महत्व :-
पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून प्रत्येक प्राणी मात्राचे जीवन आहे. पृथ्वीतलावरील प्रत्येक प्राणी मात्राचा अधिकार आहे की, त्याला मुबलक प्रमाणांत गरजेनूसार वापरण्याजोगे पाणी मिळावे. पाण्याचे महत्व सर्वांना ज्ञात आहे. म्हणून त्यांचा प्रत्येकांनी आदर केला पाहीजे. त्याला संरक्षण दिले पाहिजे. त्याची देखरेख केली पाहीजे. जगाच्या पाठीवर असा कुठलाही जीव नाही जो पाण्यावाचून जिवंत राहू शकतो. या सर्व बाबींचे महत्तव जाणून महाराष्ट्र शासनाने 16 जुलै 1971 रोजी “भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा” या विभागाची स्थापना केली आणि या विभागाकडे प्रामुख्याने भूजल सर्वेक्षण, अन्वेषन, नियोजन, मुल्यांकन व भूजल पुनर्भरणा सारखी महत्वाची कामे सोपविलेली आहेत.
या अहवालात प्रामुख्याने या विभागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती विषद करण्यात आलेली आहे. अमरावती विभागातील अंतर्भूत जिल्हृयातील प्रशासकीय, प्राकृतिक भूशास्त्रीय रचना तसेच नद्या, नाले, धरणे, तलाव, पर्वत, भूजल शास्त्रीय स्थिती, भूजल मुल्यांकन, भूजल पुनर्भरण व भूजल अधिनियम इत्यादीबाबत सविस्तर माहिती यासोबत देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश या अहवालात करण्यात आलेला आहे.
अमरावती विभागाची संक्षिप्त माहिती
- स्थळ निर्देश – अक्षांश 760 00’ ते 790 00’ पूर्व
– रेखांश 210 30’ ते 190 30’ उत्तर
- क्षेत्रफळ – 46027.00 चौ.कि.मी.
- विभागात समाविष्ट एकूण जिल्हे, तालुके व लोकसंख्या
अ.क्र. | जिल्हा | जिल्हयाचे क्षेत्रफळ (चौ.किं.मी.) | जिल्हयातील एकूण तालुके | लोकसंख्या 2011 प्रमाणे (लाखात) |
1. | अमरावती | 12210 | 14 | 28,88,445 |
2. | अकोला | 5420.00 | 7 | 1818617 |
3. | बुलढाणा | 9661.00 | 13 | 2588039 |
4. | वाशीम | 5153.40 | 6 | 1196714 |
5. | यवतमाळ | 13582 | 16 | 1775457 |
| अमरावती विभाग | 46026.4 | 56 | 7378827 |
- विभागातील सामान्य पर्जन्यमान
अ.क्र. | जिल्हा | सामान्य पर्जन्यमान (मि.मी.) |
1. | अमरावती | 814.49 |
2. | अकोला | 697.29 |
3. | बुलढाणा | 667.83 |
4. | वाशीम | 798.70 |
5. | यवतमाळ | 911.34 |
| विभागीय सरासरी | 777.93 |
|
- विभागातील प्रमुख पर्वत नद्या
- प्रमुख नद्या – गोदावरी,वर्धा, पुर्णा,तापी, पैनगंगा
- पर्वतरांगा व उपरांगा – सातपुडा, अजिंठा, सातमाळा
- नदी खोरे क्षेत्र
अ.क्र. | जिल्हा | खोऱ्याचे नाव | क्षेत्रफळ (चौ.कि.मी.) | समाविष्ट पाणलोट संख्या |
1. | अमरावती | तापी | 8045.39 | 43 |
गोदावरी | 4164.61 | 20 | ||
2. | अकोला | तापी | 5420.60 | 38 |
3. | बुलढाणा | तापी | 5654.06 | 34 |
गोदावरी | 4006.94 | 23 | ||
4. | वाशीम | तापी | 1469.10 | 12 |
गोदावरी | 3684.00 | 23 | ||
5. | यवतमाळ | गोदावरी | 13582.00 | 64 |
| एकूण |
| 46027.00 | 257 |
- अमरावती विभागाची भूशास्त्राीय व भूजलशास्त्राीय रचना
अमरावती विभागामध्ये भूजलाची उपलब्धता व वहन, क्षेत्रीय खडकांवर अवलंबून आहे हे खालील घटकांवर अवलंबून आहे.
- विघटित खडकांची जाडी
- क्षेत्राची संरचना
- खडकातील भेगा, लिनियामेंट्स, व्दितीय सच्छिद्रता ( secondary poracity)
- भूपृष्ठ स्त्रोतापासून भूजलाला होणारा फायदा
आर्कियन खडक :-ग्रेनाईट नायसेस हा जुना खडक यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात सापडतो. याला प्राथमिक सच्छिद्रता नसल्याने, भूजल शास्त्रीय दृष्टीकोणातून यामध्ये भूजलाची उपलब्धता व वहन होते. हा भूस्तर साधारण: 21 ते 40 मी. जमिनीमध्ये आढळून येतो. यानंतर विंदयन सिस्टिम आढळतो. डोलामाईट व चुनखडीमध्ये प्राथमिक सच्छिद्रता आहे परंतु, यामध्ये भेगा व पोकळी आढळते.
गोंडवाना खडक :-रूपांतरित खडकांमध्ये वालुकायम खडक, शेल व कोळसा हे प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात आढळते. गोंडवाना खडक हे बाराकर आणि कामठी या सिस्टममध्ये असून येथील वालुकायम खडक जास्त प्रमाणात सच्छिद्र आहे. त्यानंतरचा शेल हा खडक भूजल उपलब्धतेसाठी अल्प प्रमाणात योग्य आहे.
बेसाल्ट खडक :-अमरावती विभागातील वेसाल्ट खडकामध्ये व्दितीय सच्छिद्रता असून भूजल उपलब्धतेबाबत भिन्नता आढळते. मॅसिव्ह ट्रॅप मध्ये विघटित स्तर व भेगा आढळतात. व्हेसिक्यूलर ट्रॅप मध्ये प्राथमिक सच्छिद्रता असून एकमेककांस जोडलेल्या असल्याने भूजल उपलब्धतेस योग्य आहे.
गाळाचा प्रदेश :-गाळाचा प्रदेशात भूजल पातळी खोल असून अनकनफाईंड व कनफाईंड स्थितीत आढळते. यामध्ये बारीक व जाड वाळू, टोळदगड असून यामध्ये भूजल उपलब्धता व वहन क्षमता आहे व हे शाश्वत जलधर खडक असून बारमाही भूजल उपलब्ध करुन देणारे आहे.
अ.क्र. | जिल्हा | भूस्तराचा प्रकार | समाविष्ठ तालुके |
1. | अमरावती | पुर्णा गाळाचा प्रदेश | अंजनगाव, अचलपुर, चांदुर बाजार, दर्यापुर, भातकुली |
डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) | अमरावती, नांदगाव खं, चांदुर रेल्वे, धामणगाव, चिखलदरा, तिवसा, धारणी, वरुड, मोर्शी | ||
2. | अकोला | पुर्णा गाळाचा प्रदेश | तेल्हारा, अकोट, अकोला, मुर्तीजापुर, बाळापुर |
डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) | बार्शी बाकळी, पातुर, तेल्हारा, अकोट, अकोला, मुर्तीजापुर, बाळापुर | ||
3. | बुलढाणा | पुर्णा गाळाचा प्रदेश | जळगाव जामोद, संग्रामपुर, शेगाव, मलकापुर, नांदुरा |
डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) | बुलढाणा, चिखली,देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, खामगाव, मोताळा, नांदुरा, मलकापुर, शेगाव | ||
4. | वाशीम | डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) | वाशीम, मालेगाव, मंगरुळ पीर, रिसोड, कारंजा, मानोरा |
5. | यवतमाळ | डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) | आर्वी, बाभुळगाव, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, कळंब, महागाव, पुसद, मारेगाव, नेर, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, वणी, यवतमाळ, झरी जामणी |
जलजन्य खडक (गोंडवाना खडक) | झरी जामणी, वणी | ||
|
| रुपांतरीत (आर्कियन खडक) | उमरखेड, झरी जामणी, वणी, मारेगाव |
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या योजना
- अमरावती विभागातील खारपाण पट्टा
- गाळाचा प्रदेश – 7500 वर्ग किमी
- खार पाण पट्टयाचा प्रदेश – 4692 वर्ग किमी
- खार पाण पट्टयात समाविष्ट तालुके – 16 (अमरावती-6, अकोला-5, बुलढाणा-5)
खारपाण पट्टयातील भूजल बाबत माहिती
- पुर्णा नदीच्या गाळाच्या प्रदेशात पाण्याची रासायनिक गुणवत्ता उत्तरेकडील भागात सर्वसाधारण चांगली आहे.
- पूर्णा गाळाच्या प्रदेशाच्या उत्तरेकडचा भाग भूजलदृष्टया योग्य आहे.
- दक्षिणेकडील उथळ आणि खोल जलधारक प्रस्तरातुन उपलब्ध होणारे पाणी खारे आहे.
- पूर्णा गाळाच्या प्रदेशातील दक्षिणी भागातील उथळ आणि खोल जलधर खडकातील भाग खाऱ्या पाण्यानी व्यापलेला आहे.
- खोऱ्याच्या दक्षिण भाग क्षारयुक्त असून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अयोग्य आहे.
- दक्षिणी भागातील पुर्णा गाळाच्या प्रदेशातील भूजल उच्च TDS व खारेपणाचे परिणाम पिण्याचे किंवा शेतीच्या उपयोगाकरिता उपयुक्त नसल्याने पृथ:करणाच्या अहवालानुसार आढळून आले आहे.
- खारपाण पट्टयातील भूजलाची कंडक्टव्हिटी 800 ते 5200 या प्रमाणात आहे.
- या भागातील भूजलाचे TDS 800 ते 5200 पर्यंत आहे.
- रासायनिक पृथ:करणाच्या निष्कर्षानुसार असे दिसून येते की, जास्त प्रमाणातील विरघळलेल्या क्षारांच्या प्रमाणासोबत जास्त प्रमाणात सोडीयम, क्लोराईड, बायकार्बोनेट आणि मॅगनेशियम सोबत असतात.
- पुर्णा नदीतील गाळ प्रामुख्याने मातीयुक्त असल्याने पाण्याची वहन क्षमता अतिशय कमी आहे. त्यामुळे पाण्यातील क्षारांचे नि:क्षारीकरण होत नाही. पाण्यातील क्षारांचे प्रमाण या भागात वाढत असल्याचे दिसते.