परभणी जिल्ह्याची माहिती
प्रस्तावना :
परभणी जिल्हा महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी असुन औरंगाबाद विभागाच्या पुर्वेस आहे. परभणी हा साधु संताचा जिल्हा आहे. पुरातन काळात परभणी शहराला प्रभावती नावाचा अपभ्रंश होवून परभणी नांव प्रचलीत झाले. परभणी हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे आणि पूर्णा, पाथरी, पालम, गंगाखेड, सेलू, पाथरी, सोनपेठ आणि जिंतुर ही महत्वाची शहरे आहेत. प्रशासकीय दृष्टया जिल्ह्याची परभणी, सेलू, गंगाखेड आणि जिंतुर या चार उपविभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे. या चार उपविभागामध्ये मिळुन ९ तालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात एकुण 848 गावे आणि ९ शहरी केंद्रे आहेत.
स्थान :
हा जिल्हा 18o45’00” व 20o10’00” उत्तरेस अक्षांश व 76o13’00’’ व 77o39’00’’ पूर्व रेखांशावर वसलेला आहे. परभणी जिल्हयाच्या पुर्वेस हिंगोली, पश्चिमेस बीड, उत्तरेस जालना व दक्षिणेस नांदेड जिल्हा येतो. जिल्हयाची पुर्व पश्चिम लांबी 128.72 किमी2 असून उत्तरदक्षिण रुंदी 104.58 किमी2 आहे. जिल्हयाचे एकुण क्षेत्रफळ 6511 चौ.किमी. 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 1835982 लक्ष (महाराष्ट्रात आठव्या क्रमांकावर) आहे.
हवामान आणि पाऊस :
परभणी जिल्हयाचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. जून ते ऑक्टोबर या महिन्यात पाऊस असतो. ऑक्टोबर पासुन तापमानात घट होत असून डिसेंबरमध्ये बरीच घट होत असल्याने हवामान थंड असते. याउलट मार्च महिन्याच्या शेवटीपासुन तापमान वाढत जाऊन तापमानाने उच्चांक गाठल्याने उन्हाळा तिव्र जाणवतो. सर्वसाधारण कमाल तापमान 45.6 डि.से. व हिवाळयात किमान तपामान 4.44 डि.सें. ऐवढे असते.
जिल्हयात दक्षिण पश्चिम मान्सुनद्वारे जून ते ऑक्टोबर पाऊस पडत असून हा जिल्हा शाश्वत पर्जन्यमानाच्या क्षेत्रात मोडतो. येथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान 774.59 मि.मि. व सरासरी पर्जन्यमानाचे 45 दिवस आढळून येतात.
भूविज्ञान :
संपूर्ण जिल्हा हा बेसाल्ट या अग्निजन्य खडकांनी व्यापलेला आहे. जिल्हयाच्या उत्तर व दक्षिण-पूर्वेस मॅसिव्ह बेसाल्टचे प्रमाण जास्त असुन इतरत्र व्हेसीक्युलार तथा झिओलेटीक बेसाल्टचे प्रस्तर आढळून येतात. तसेच गोदावरी, पूर्णा, दुधना या मुख्य नद्यांच्या क्षेत्रात गाळांचा थर आढळून येतो. बेसाल्ट खडकांच्या विघटनामूळे तयार झालेला विघटीत बेसाल्ट व त्यामध्ये आढळणाऱ्या सांधे व भेगायुक्त खडक हा मुख्य जलधारक खडक आहे.
भूगोल :
परभणी जिल्हयातील उत्तरेकडील जिंतुर तालुक्यात अजिंठा डोंगर रांगा असून दक्षिण-पुर्वेस गंगाखेड व पालम तालुक्यात बालाघाट पर्वतांच्या कमी उंचीच्या डोंगर रांगा आढळून येतात. या डोंगर रांगातुन उगम पावणारे ओढे पूढे करपरा, दूधना, पूर्णा नदीस मिळून शेवटी गोदावरी नदीस मिळतात. दुधना व गोदावरी नद्यांच्या गाळांमुळे त्यांच्या काठावरील गावांमध्ये काळया मातीचा सुपीक प्रदेश तयार झालेला आहे. गोदावरी, पूर्णा, दुधना या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. गोदावरी नदीवर पालम तालुक्यात जांभुळबेट नावाचे एक बेट तयार झाले आहे. ज्याच्या दोन्ही बाजुने गोदावरी नदी वाहते.
जलविज्ञान :
संपूर्ण जिल्हा हा बेसाल्ट या अग्निजन्य खडकांनी व्यापलेला आहे. जिल्हयाच्या उत्तर व दक्षिण-पूर्वेस मॅसिव्ह बेसाल्टचे प्रमाण जास्त असुन इतरत्र व्हेसीक्युलार तथा झिओलेटीक बेसाल्टचे प्रस्तर आढळून येतात. तसेच गोदावरी, पूर्णा, दुधना या मुख्य नद्यांच्या क्षेत्रात गाळांचा थर आढळून येतो. बेसाल्ट खडकांच्या विघटनामूळे तयार झालेला विघटीत बेसाल्ट व त्यामध्ये आढळणाऱ्या सांधे व भेगायुक्त खडक हा मुख्य जलधारक खडक आहे.
ऐतिहासिक:
परभणी हा साधु संताचा जिल्हा आहे. पुरातन काळात परभणी शहराला प्रभावती नगरी असे नांव होते. या नावाचा अपभ्रंश होवून परभणी नांव प्रचलीत झाले.
जिल्हयातील गंगाखेड तालुक्यात संत जनाबाई यांचे जन्मस्थ्ळ व मंदिर आहे, जिंतुर तालुक्यात जैन समाजाचे अतिशय क्षेत्र नेमगिरी, परभणी शहरी भागात सय्यद शहा तुराबुल हक दर्गा व पारदेश्वर मंदिर तसेच पाथरी येथील साईबाबांचे मंदिर तथा जन्मस्थान व पालम तालुक्यातील जांभुळबेट हि प्रेक्षणीय स्थळे आहेत. परभणी येथे मराठवाडयातील एकमेव कृषी विद्यापीठ आहे.
भूजल मूल्यांकन :
२०२०-२०२१ या वर्षासाठी जिल्ह्याचा भूजल संसाधन अंदाज काढण्यात आला. जिल्ह्यातील सर्व 33 जुने पाणलोट व 35 नविन पाणलोट हे सुरक्षित श्रेणीत येतात.
भूजल गुणवत्ता :
वातावरणातील पाण्यात विरघळणारे विविध वायू आणि आयन यांची सांद्रता, मातीचा स्तर आणि खनिजे आणि खडक हे पाण्याचे वैशिष्ट्य आहेत. हे शेवटी भूजलाची गुणवत्ता ठरवते. पाण्यातील विविध रासायनिक घटकांचा मानवाच्या जैविक व्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पिण्याच्या उद्देशाने भूजलाची उपयुक्तता निश्चित केली जाते. पिण्याच्या पाण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने प्रस्तावित केलेली मानके) पिण्याच्या उद्देशासाठी भूजलाची योग्यता ठरवण्यासाठी वापरली जातात. रासायनिक आणि बॅक्टेरियोलॉजिकल पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने प्रयोगशाळेद्वारे तपासले जातात. एक जिल्हास्तरीय NABL आधीस्वीकृती पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा जिल्हा मुख्यालयात आहे. NABL मान्यताप्राप्त चार उपविभागीय प्रयोगशाळा जिल्ह्यात तहसील स्तरावर आहेत. बोरी, पाथरी, सेलू व गंगाखेड ही त्यांची नावे आहेत. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात.
भूजल संवर्धन आणि कृत्रिम पुनर्भरण :
जिल्ह्यातील विविध जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यात भूजल संवर्धन प्रस्तावित आहे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जलसंधारणाचे काम हाती घेतले आहे आणि जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतासाठी कृत्रिम पुनर्भरण रचना प्रस्तावित आहेत. सन २०२२-२३ या वर्षा मध्ये 235 गावांमध्ये 948 रिचार्ज शाफ्टचे काम पूर्ण झाले. सन २०२3-२4 या वर्षा मध्ये 104 गावांमध्ये 624 रिचार्ज शाफ्टचे काम प्रस्तावीत होते. पैकी 103 गावांमध्ये 618 रिचार्ज शाफ्टचे काम पूर्ण झाले आहे.
भूजल संबंधित समस्या:
भूजलाच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यात भूजल मुल्यांकन-२०२१ नुसार पुरेसे भूजल आहे. सर्व 35 पाणलोट सुरक्षित श्रेणीत येतात. परभणी जिल्हयातील उत्तरेकडील जिंतुर तालुक्यात अजिंठा डोंगर रांगा असून दक्षिण-पुर्वेस गंगाखेड व पालम तालुक्यात बालाघाट पर्वतांच्या कमी उंचीच्या डोंगर रांगा आढळून येतात. डोंगराळ भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या असते आणि जिल्ह्याच्या काही वेगळ्या भागात उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या असते.
विशेष भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये:
1) जांभुळबेट :
पालम तालुक्यामध्ये गोदावरी नदिच्या पात्रामध्ये एक उंचवटा तयार होऊन नदीचे पात्र विभागले गेले आहे व त्यामुळे नदीपात्रामध्ये एक बेट तयार झाले आहे. याच बेटाला जांभुळबेट असे म्हणतात. या टेकडीवर जांभळाचे भरपुर झाडे असल्यामुळे याला जांभुळबेट असे नांव पडले आहे. यावर हिवाळयामध्ये मोर भरपुर प्रमाणात आढळतात. पावसाळयामध्ये मात्र यावर जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो.